-------सेवाभाव------
अंधारलेल्या भयाण त्या राती,
उगवला तारा क्षितिजा वरती !
दिसु लागल्या उजेडाच्या वाटा,
निर्मिल्या तु जगण्याच्या पायवाटा !१!
विस्तारले तु परीघ आशा,
बदलल्या ललाटी भाग्य रेषा !
जगी जगावे माणुस व्हावे,
सभोवती आपुल्या जीवे
जपावे !२!
गाव अपुले विवेकी विचारु,
गतिमान चक्रे बदले स्वीकारु !
येता जरी संकटे गनिमी कपटे,
झुंजू एकसंघे नव्हे एकटे !३!
बाहुत माझ्या शुद्धचित यावे,
ध्यानात माझ्या दुबळेही तरावे !
हा डाव जीवनी सोंगट्याचा,
जसा खेळ ऊन सावल्यांचा!४!
वाट माझी,बोट माझे धरावे,
जिथे असु जसे असु मज स्मरावे !
पळतील भुते कराल विळखे,
माझिया वचने सन्मार्ग उमजे !५!
खवळलेल्या सागरा, दीपस्तंभ मी,
दिशाहीन नाविकांचा आधार मी !
मृत्तिकेतुन झेप घेणारा कोंब मी!
नभातून धरेवर बरसणारा
थेंब मी!६!
रणांगणी केला पाडाव शत्रुचा,
अंतरी विनाश षढरिपुचा !
जाणिजे मोल ज्ञानेंद्रियांचे,
शुभ चिंतावे ध्यास सकलांचे !७!
पळस फुलावा,बेधुंद व्हावा,
तैसे चि बहरावे सकल जन !
रंगात रंगुन एक वर्ण व्हावे,
भेदाभेद उरुची नोहे,शुद्ध व्हावे मन !८!
याच भूमीवरी रोवले मी बीज,
अंकुरले दिशादाही जपावे तीज !
डौलदार वृक्ष, अनेकांना छाया!
लावीतसे माया, तुज सेवाभाया !९!
जयसिंग द जाधव पातूर जि अकोला(9923482062)
0 Comments