Subscribe Us

बोगस घुसखोरी सारू गोरूर आत्मदहन


 *आपल्या समाजातील कर्तव्यनिष्ठ चार वाघांचा  आत्मदहनाचा इशारा*

*सन्माननीय गृप सभासद बांधव, भगिनी*

जय सेवालाल*

आपणास माहितच आहे की मागील कित्येक वर्षांपासून आरक्षण बचाव समिती मार्फत सन्माननीय राजेश भाऊ राठोड बुलढाणा, सन्माननीय श्यामभाऊ राठोड, सन्माननीय अमोलभाऊ राठोड, सन्माननीय सचिनभाऊ राठोड प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर विविध जातपडताळणी समित्या, बार्टी पुणे, मंत्रालय तसेच विविध माध्यमांतून हा लढा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने पुढे नेत आहेत...*

या चार वाघांना अनंत अडचणी असतांना सुद्धा हे वाघाचे 🐅🐅 काळीज असलेले बांधव आपल्या हक्कासाठी, आपल्या कुटुंबाचे आरक्षण वाचविण्यासाठी, आपल्या समाजावरील हा घाला दुर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत... ही आपल्यासाठी गर्वाची, अभिमानाची बाब आहे...*

बंधुंनो आम्हाला मर्यादा असल्याने, काही तांत्रिक अडचणी असल्याने आम्ही या लढ्यात फार मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊ शकत नाही... तरी सुद्धा आपल्यातून सन्माननीय राजपाल भाऊंसारखे हाडांचे कार्यकर्ते राबराब राबून, सगळ्यांना संघटीत करून, सगळ्यांच्या सहकार्याने पांढरे वादळ महामोर्चा काढून त्याला  आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने यशस्वी केले... दिनांक ०९.१०.२०२३ रोजी जिवती, जिल्हा चंद्रपूर येथे, जिल्ह्यातील विविध संघटना, कर्मचारी संघटना, विविध सामाजिक संघटनांनी, खास करून जिवती येथील हाडांच्या कार्यकर्त्यांनी पांढरे वादळ काढून यशस्वी केले... हे सारे आपल्या सहयोगातून, सहभागातून सरकारचे लक्ष केंद्रित करून आपले आरक्षण वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत..*

बंजारा आरक्षण बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध कर्मचारी संघटना, खासकरून भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था, एन.एस.डी.ए., वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, गोर सेना, गोर शिकवाडी, भारतीय बंजारा सेना, अ.भा. तांडा सुधार समिती, बंजारा ब्रिगेड अशा नानाविध संघटना...ज्या समाजातील ज्वलंत मुद्द्यांवर लगेच एकत्रित होऊन संघर्ष करायला, रस्त्यावर उतरायला तयार होतात... ह्यांच्या मुळे या चळवळीला फार मोठे बळ प्राप्त झाले आहे...*

आज समाजावर जिवन मरणाचा प्रश्न आ वासून उभा असतांना, आपल्या डोळ्यासमोर आपला घास कोणी हिरावून नेत असतांना आम्ही गप्प बसणे योग्य नाही... राजाश्रय प्राप्त समाज आज आपल्या आरक्षणात घुसखोरी करून आपले समाजातील बर्याच बांधव/ भगिनी यांचे भविष्य अंधकारमय केले आहे व भविष्यात फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढून हे बोगस लाभार्थी तुमचे संपूर्ण आरक्षणच खाणार आहे... कारण ह्या सवर्ण लोकांना सरकारातून राजाश्रय प्राप्त आहे‌...*

आज सरकार आपले समाजाचे फार मोठ्या प्रमाणात दमन‌ करत असतांना, आपण चुप आहोत... परंतु वरील चार वाघ 🐅 आपली डरकाळी फोडून समाजाचे आरक्षण वाचविण्यासाठी मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक १२.१०.२०२३ रोजीच्या पोहरादेवी येथील नियोजित दौऱ्यादरम्यान आपल्या आरक्षणातील घुसखोरी तसेच ज्या ५० बोगस लोकांचे अहवाल प्राप्त झाले आहे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करणे, SIT ची पुनर्स्थापना करण्यासाठी # आत्मदहनाचा # इशारा दिला आहे...*

बांधवांनो हा लढा फक्त या लोकांचा नाही, तर तमाम विजा-अ प्रवर्गातील १४ तत्सम जातींचा आहे... हे लक्षात घ्या... हा लढा त्यांचा नसून आपल्या सगळ्यांच्या आहे...‌अश्यावेळी त्यांना आमची गरज आहे... आमच्या सहभागीची गरज आहे... आमच्या समर्थनाची गरज आहे...*

म्हणून दिनांक १३.१०.२०२३ रोजी होणाऱ्या या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन त्यांच्या समाजा साठीच्या या #आत्मदहन चळवळीत# लाखोंच्या संख्येने, स्वप्रेरणेने हजर राहून त्यांना सहकार्य करावे, त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न करावे ही आग्रहाची नम्र विनंती आहे...*

*जय सेवालाल जय संविधान*

Post a Comment

0 Comments