Subscribe Us

गोर सेना मुंबई कडून निवेदन


निवेदन  

                                 ता.
                         24/08/2021


   प्रति,  
                                 
      मा.ऊध्दवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

       मार्फत

मा.जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा.नवी मुंबई............

निवेदक :- गोरसेना जिल्हा.........

संदर्भ :-महाराष्ट्र राज्यभर  गोर सेनेच्या वतीने नवि मुंबई विमानतळास हरीत क्रांतीचे प्रणेते मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यासाठी चाललेल्या आंदोलनाला अनुसरून लक्ष केंद्रित करणे बाबत.

विषय :- मुंबई विमानतळास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्या बाबत.  

 महोदय ,  
                                      आम्ही गोर सेना जिल्हा......नवी मुंबई... संदर्भासहित उपरोक्त विषयान्वये खालील सही करणार विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की, नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतराव नाईक यांचे नांव देण्यात यावे. मा. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देवून विकास कामाला गती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे शहर बनवण्यामध्ये मा. वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवाय हरीत क्रांतीचे स्वप्न पाहताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी, उजनी,अप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.महाराष्ट्रात हरित क्रांती करून महाराष्ट्राला देशात एक नंबर वर आणले. हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडे अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणाऱ्या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल. म्हणून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे हि आमची मागणी आहे.करीता आपल्या सेवेत अर्ज सादर करीत आहोत.अन्यथा आम्ही गोर सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून नवी मुंबईला वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यास भाग पाडू. करिता आपल्या सेवेमध्ये निवेदन सादर करीत आहे. ही नम्र विनंती आहे.
            
         धन्यवाद !


                     
विकास राठोड जिल्हा अध्यक्ष नवी मुंबई

सुनील राठोड जिल्हा सचिव नवी मुंबई

अंकुश पवार जिल्हा उपध्यक्ष नवी मुंबई

देवा राठोड पनवेल शहर प्रमुख

 


 

Post a Comment

0 Comments