Subscribe Us

धोळ आंधी-औरंगाबाद


 *_चला "पांढरे वादळ" चे भाग बना.!!!_*

मागील काळात बंजारा समाावर शासनाच्या वतीने सातत्याने अन्याय होत आहे.याचे ताजे उदाहरण द्यायचे असेल तर नुकतेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातील  सरकारच्या एका घोषणेचे देता येईल. अनेक वर्षापासून गाजत असलेल्या राज्यातील कांही प्रगत जाती मुळ विमुक्त व भटक्या जाती जमाती प्रवर्गातील जात चोरुन सवलती लाटणाऱ्या जात चोरांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी म्हणून आ. राजेश राठोड यांनी लक्ष्यवेधी प्रश्न विधान परिषदेत मांडला होता. या   प्रश्नावर उत्तर देतांना  सभागृहात सरकारच्यावतीने एका जबाबदार मंत्री महोदयाने सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सरकार SIT नेमणार असल्याची घोषणा करुन मुळ विमुक्त व भटक्या समाजाला कांहींसा सुखद धक्का दिला होता. पण या मंत्री महोदयाने सभागृहात सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन अठ्ठेचाळीस तासानंतर   जात चोरांविरुद्ध SIT नेमणार नसल्याचे  सभागृहात घोषित केले ! " *मी यापूर्वी सभागृहात  SIT लागू करण्याबाबत  जे बोललो होतो ते चुकुन बोललो असा बेजबाबदारपणाचा चुना लावून मंत्री महोदय मोकळे झाले.*" जात चोरांची  एवढी भिती या सरकारला का आहे हे मात्र कळत नाही. सभागृहात सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन अठ्ठेचाळीस तासात भूमिका बदलणाऱ्या या सरकारला भंगेडी आणि धोखेबाज सरकार म्हणायचे नाही तर काय म्हणायचे ? हे सरकार जात चोरांच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे आहे हेच त्यांनी आपला शब्द फिरवून सिद्ध केलेले आहे.

     बांधवांनो ! या भ्रष्ट आणि धोकेबाज सरकारविरुद्ध समस्त मुळ विमुक्त व भटक्या समाजाने वज्रमुठ आवळण्याची काळाची गरज आहे. सामाजिक न्यायाची घेतलेली भूमिका    बदलून मुळ विमुक्त व भटक्या या उपेक्षित समाजाची क्रुर चेष्टा या सरकारने केलेली आहे. याची परतफेड आपण आगामी निवडणुकीत योग्य प्रकारे करुन शुद्ध हरपलेल्या  *शिंदे - फडवणीस - अजित पवार* यांच्या भ्रष्ट सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी त्यांची  नशा उतरवण्यासाठी संपूर्ण ताकदीने एकत्र येण्याची नितांत गरज आहे.

       आता जात चोर गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारला गाडण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणून तमाम मुळ विमुक्त व भटक्या समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कवी, भजनकरी, राजकीय पुढारी, विचारवंतांना नम्र विनंती आहे की एकमेकांची उणीदुणी काढण्यात, एकमेकांना दोष देण्यात वेळ खर्च न करता जात चोरांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट सरकार विरोधात सर्व एकदिलाने एकत्र येऊन रान पेटवू या ! चला तर जात चोरुन सवलती लाटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या दुतोंडी, धोकेबाज, भ्रष्ट सरकारविरुद्ध वज्रमुठ आवळू या.

पांढर्या वादळाचा घटक बघूयात.


*समस्त बंजारा भटके विमुक्त समाज*

Post a Comment

0 Comments