Subscribe Us

*वास्तुशास्त्र खरे कि खोटे?*


 *वास्तुशास्त्र खरे कि खोटे?*

*✍याडीकार पंजाब चव्हाण, पुसद  📞  9421774372

===========================

 *दिशा कोणती ही वाईट नसते, भुमाता दोष युक्त असूच शकत नाही, वास्तुशास्त्रा मुळे प्रभावित होणारा समाजातील विशिष्ट वर्ग ,आपल्या आरोग्याचा वास्तुशास्त्राची तिळमात्रही संबंध नाही, अंधश्रद्धा मध्ये अधिक एक भर म्हणजे वास्तुशात्र*.

 गेल्या 20 वर्षापासून वास्तुशास्त्राविषयी लोकांमध्ये फार जागृती वाढली आहे *वास्तुशास्त्राच्या बाबतीत लोकांमध्ये अलग अलग मतप्रवाह आहे* काही लोक याला प्राचीन शास्त्र मानतात तर काही लोक याला कोणताही आधार नसून *अवैज्ञानिक* आहे असे म्हणतात .त्यामुळे वास्तूशास्त्र हे नेहमी वादात सापडलेले आहे माझ्या एका इंजिनिअर मित्राने नाव न छापण्याच्या अटीवर असे सांगितले की जेव्हा घराचा संपूर्ण नकाशा बनविला जातो तेव्हा त्याला सिव्हिल आणि आर्किटेक नियमानुसार तयार करण्यात येतो *परंतु मकान मालकाला  दहावी पास तथाकथित वास्तुशास्त्री वास्तु  बाबत सल्ला देतो तेव्हा मात्र रंगात भंग झाल्यासारखे वाटते* आर्किटेक आणि वास्तूशास्त्र शास्त्राची जुळवणी करणे म्हणजे विज्ञान आणि अंधश्रद्धा चा मेळ बसविणे होय.


*वास्तुपुरुषाची गोष्ट*

 वास्तुशास्त्राचा निर्माता वास्तुपुरुष होय. त्याची कथा पाहूया देवता आणि असुरा चे युद्ध झाले त्यामध्ये असुरा कडून अंधकासुर आणि देवता कडून भगवान शिव होते युद्धामध्ये दोघांच्याही घामाचे काही थेंब  पृथ्वीवर पडले त्यामधून एक अत्यंत बलशाली विराट पुरुषाची निर्मिती झाली त्या पुरुषाने देवता आणि असुर हे दोघेही फार घाबरून गेले देवतांना वाटले की ही हे असुरा कडील पुरुष आहे आणि असुरांना वाटले की हे देवता कडील पुरुष आहे त्यामुळे त्याला नवीनच देवता मानू लागले या भ्रमामुळे सुरू असलेला युद्ध थांबविण्यात आला आणि देवता व असुरांनी त्या विराट पुरुषाला घेऊन ते ब्रह्माजी जवळ गेले ब्रह्माजीनी  त्याला मानस पुत्र म्हणून घोषित केले .आणि त्यांचे नाव *वास्तुपुरुष* ठेवले .वास्तुपुरुष एका विशेष मुद्रे मध्ये शयन कक्षामध्ये विश्रांती ला आडवे पडले  त्यामुळे त्यांच्या काही भागावर देवता आणि काही भागावर असुरांनी वास करणे सुरु केले .त्यानंतर ब्रह्माजींनी असा संदेश दिला की जो कोणी मनुष्य भवन, नगर, तलाव, मंदिर इत्यादी कामाचे निर्माण करेल त्या वेळी *वास्तूपुरुष* याला ध्यानात ठेवले नाही तर असुर  त्याचे भक्षण करतील आणि जे लोक वास्तुपुरुषाला ध्यानात घेऊन कार्य करतील त्याला देवता सहकार्य करील अशा प्रकारे वास्तुपुरुषाची रचना झालेली आहे 


*वास्तुशास्त्र म्हणजे काय?*

 वास्तु शब्दापासून वास्तूचे निर्माण झाले असावे असा समज लोकांमध्ये आहे वास्तुशास्त्राचे आधारावर आधारित काही प्राचीन ग्रंथ आहे परंतु खूप साऱ्या प्राचीन ग्रंथामध्ये जमिनीची निवड पासून घराचे निर्माण कसे करावे .याबाबतीत बरेच संदर्भाच्या ग्रंथाचे शोध घेऊन वास्तुशास्त्राची अनेक पुस्तके लिहिली गेली आहे हे *सर्व पुस्तक समरांगण सूत्र, मनुस्मृती, वास्तु रत्नाकर, शिल्पशास्त्र ,राजवल्लभ मंडलम ,बुहद वास्तू माला, वास्तु सार संग्रह ,गृह वास्तु प्रदीप ,मत्स्यपुराण या पुस्तकाचे संदर्भ घेऊन लिहिलेले आहे*


 *वास्तुशास्त्राचा उद्देश*

 वास्तुशास्त्री असे दावा करतात की जर मनुष्याने वास्तुशास्त्राच्या हिशेबाने भवन, दुकान ,कारखाना व मंदीर बनवले तर त्यांच्या घरात खुशाली शांती आणि त्यांची भरभराट होते. कोणत्याही प्रकारची जन धन हानी होत नाही. हे खरे वास्तुशास्त्राचे उद्देश आहे ते असे सांगतात की तमाम प्रकारच्या अडचणी बिमारी कुटुंब कलम हे वास्तुशास्त्रानुसार बनवलेल्या घरात राहत नाही वास्तुचे  मुख्य स्तंभ पौराणिक शास्त्रानुसार वास्तुशास्त्र तीन आधारावर अवलंबून आहे *जाती, दिशा, दिवस* चला आपण हे तीन आधार पाहू या 


*जाती*

 हे वास्तुशास्त्राचे सर्वात प्रमुख आधार आहेत जातीच्या आधारावर वास्तुची सल्ला  देण्यात येते .जरी जमीन निवडीचे असो की निर्माण सामुग्रीची नेहमीच जाती आधारावर  अलग अलग जातीप्रमाणे सल्ला दिला जातो. यामध्ये लांबी-रुंदी ही जातीनिहाय वेगवेगळी सांगितली जाते. जसे ब्राह्मण लोकांच्या घरासाठी लांबी रुंदी 10 अंश अधिक क्षत्रिय लोकांकरिता लांबी रूंदी पेक्षा  8 अंश,  अधिक वैशा साठी 6 अंस तर शुद्रा साठी 4 अंश अधिक सांगितल्या जाते 


*दशंशयुक्तो विस्तारा* *आयामो विषवेश्मनामु*

*अष्टषट्चतुरं शाढ्य*

*क्षत्रादित्रयवेश्मनाम्* 

 जातीनुसार घराची सीमा वास्तुशास्त्र ठरवते .जसे शुद्रा  करिता साडेतीन तळा चे घर कल्याणकारी राहते .या पेक्षा जास्त जर असेल तर त्याच्या कुळाचा नाश होतो.

 *साधात्रिभुमि  शुद्राणा* *देश्म  कुयांदू  विभुतय*

 *अंतोअधिकतर यत्  स्वात्*

*तत्करोति कुलक्षण्म्*


  *दिशा* 

वास्तुशास्त्राचा दुसरा नियम आहे दिशा हे एक प्रमुख आधार असून उत्तर आणि पूर्व दिशा चे घर शुभ मानतात तर दक्षिण मुखी घर अशुभ  मानले जाते .* *परंतु विश्वकर्मा वास्तुशास्त्रात 16 दिशा चे वर्णन असून* आठ दिशा या प्रकारच्या आहेत उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम ,ईशान्य, आग्नेय , निरुऋ, वायव्य जातीनुसार कोणत्या माणसाला कोणती दिशा चे शुभ फळ मिळतील हे पाहिले जाते .


*दिवस*

 दिवस आणि तिथीला वास्तुशास्त्रामध्ये फार मोठे महत्त्व आहे .हे एक आधाराच्या रूपात काम करत असते या अंतर्गत पौर्णिमा अमावस्या वार चा विचार केला जातो . *खास करून गृहप्रवेशाच्या वेळी तिथी आणि दिवस महत्त्वाचा मानला जातो* गृह वास्तुशास्त्रातील ग्रंथ मत्स्यपुराणात मास पक्ष आणि वार याला गृहनिर्माणा मध्ये शुभ तर काही ठिकाणी अशुभ सांगितलेले आहे ज्यादातर *वास्तुशास्त्री* किंवा आर्किटेक असलेले वास्तुशास्त्री सुद्धा सांगतात की वास्तुशास्त्र हे विज्ञानाच्या रूपात आहे *परंतु त्यांना विसर पडतो की विज्ञानाचा एक नियम असतो विज्ञानाच्या कसोटीवर उतरण्यासाठी त्याचे परीक्षण, प्रयोग, प्रवृत्ती अनुमान आणि डाटा संग्रहण करावे लागते* जर नेहमी एकच परीक्षण येत असेल तर विज्ञान नाहीतर अंधविश्वास असल्याचे सिद्ध होते. वास्तुशास्त्रानुसार कोणतेही घराचे प्रवेशद्वार दक्षिणेकडे असायला नको कारण ते अशुभ मानले जाते . *परंतु कोणत्याही मोठ्या गावात किंवा शहरात जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी शेकडो वर्षापासून दक्षिणमुखी असलेली घरे असून त्यांचे कोणतेही नुकसान झाल्याबाबत ऐकिवात नाही*. त्याच प्रकारे दुकाने सुद्धा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उघडी असतात एकीकडे उत्तर दिशा तर दुसरीकडे दक्षिण दिशा परंतु त्यांचा ही धंदा चांगला तेजीत असतो


 *दारूचे दुकान*


 दारूचे दुकान कोणत्याही दिशेला राहू द्या .किंवा गल्लीबोळात राहू द्या. तेथे तुफान गर्दी राहत असून दुकान फारच भरभराटीत राहते येथे मात्र वास्तुशास्त्राचे नियम फिट बसत नाही. त्यामुळे येथे वास्तुशास्त्र  टाय --टाय फिस  होऊन जाते .* *दारू दुकानाला वास्तुशास्त्राचे नियम का लागू होत नाही .हे मात्र कोडेच आहे* पण वास्तु शास्त्री ला जर ही गोष्ट सांगितली तर ते काही हालगु मालगु समर्थन करतील


 *अमेरिका व्हाइट हाऊस*


 अमेरिका येथील व्हाइट हाऊसचे प्रवेशद्वार दक्षिण मुखी असून *पूर्ण बिल्डिंग वास्तुशास्त्राच्या नियमांमध्ये बनवलेली नाही* तरीही अमेरिका हे राष्ट्र सर्वात शक्तिशाली आणि प्रबळ सत्ता केंद्राचे प्रमुख आहेत .आणि खूप वर्षापासून जगात  त्यांच्या नावावर शकत्तीशाली देशाचा  किताब आहे .


*पुणे येथील शनिवार वाडा*


 पेशवा ब्राह्मणांसाठी त्याकाळी पुण्यात त्यांच्या राहण्याकरिता एक किल्ला रुपी भवन बनविण्यात आला होता. त्याचे नाव आहे शनिवार वाडा . *शनिवार वाडा हे पूर्ण वास्तुशास्त्राचे नियमाला  धरून बनविण्यात आले* हा एक राज महल होता तरीही पेशवा ब्राह्मणावर अनेक संकटे आली त्यामुळे ते कर्जबाजारी होते आणि त्यांच्या कुटुंबास जिवीत हाणी सुद्धा झालेली आहे त्यामुळे प्रश्न पडतो की ही वास्तू जर वास्तुशास्त्रानुसार बांधलेली असतानाही त्यांच्यावर संकटे का आली? *वरील अनेक उदाहरणांवरून असे स्पष्ट होते की वास्तुशास्त्र हे एक नवा प्रकारचा अंधविश्वास आहे* यामुळे याला इंग्लिश मध्ये सोडो सायन्स आणि हिंदीमध्ये छदम् विज्ञान म्हणतात .वास्तुशास्त्राचा हा रोग केवळ हिंदू मध्येच नाही तर मुस्लिम, सिख ,ईसाई, जैन ,बौद्ध यांच्यामध्ये सुद्धा थोड्या फार प्रमाणात आहे ज्योतिष्य सारखेच वास्तुशास्त्र हे देशात अंधविश्वास ला बढावा देऊन समाजातील लोकांची लुट करत आहे. याला जर थांबवायचे असेल तर घर *बांधकामाला जसे गुणवत्तेनुसार ग्राहक कायद्याच्या नियमात आणलेले आहे तसेच  वास्तुशास्त्राला सुद्धा ग्राहक कायद्यामध्ये रुपांतर करावे* जेणेकरून भोळी बाळी जनतेची लूट होणार नाही आणि लोक अंध विश्वासातून बाहेर पडुन विज्ञानाची वाट धरतील .।।


*खरे वास्तुशात्र असे आहे.*


सर्वसाधारणत: जी  काही प्रचलित शास्त्रे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मानसशास्त्र ,रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र खगोलशास्त्र ,जीवशास्त्र, स्थापत्यशास्त्र ही सगळी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधारलेली शास्त्र आहेत. परंतु किमान पंधरा ते वीस वर्षांपूर्वी काही तथाकथित वास्तुशास्त्रीय लोकांनी निर्माण केलेले एक नवीन शास्त्र म्हणजे *वास्तुशात्र*  उदयास आलेला आहे. खरे वास्तुशास्त्र असे आहे 100% वास्तुशास्त्राप्रमाणे एखादी वास्तू बांधली असावी. पण त्या वास्तुमधील करता पुरुष वा त्या कुटुंबातील कुणी व्यक्ती व्यसनाधीन असेल व कुटुंबातील लोकांना शिवीगाळ करून घरातील शांती भंग करीत असेल. तर त्या वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या वास्तूचा काय उपयोग पण जर एखादी वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे  बांधलेली नसली  पण आपण आपल्या कुटुंबामध्ये प्रेमाने वागलो .प्रत्येकाला आदर दिला .पत्निला आदर दिला, आई-वडिलांची सेवा केली. मुलांना चांगले संस्कार दिले. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागलो. तर त्या वास्तुमधील आनंद कोणीही हिरावून नेऊ शकत  नाही. त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल बांधवांना शक्य तेवढी मदत करणे ,आपला शेजारी आपल्यापेक्षाही सुखी  व्हावा अशी मनोमन इच्छा बाळगणे इत्यादी गोष्टी  काटेकोरपणे सगळ्यांनीच पाळणे म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये व सभोवताली *समाजामध्ये प्रत्येकाशी  प्रेमाने व आत्मीयतेने वागणे हेच खरे वास्तुशास्त्र होय*


 *संदर्भ ग्रंथ*

1) तर्कशील पथ मासिक पत्रिका अक्तुबंर 2020 कुरूक्षेत्र  मूळ लेखक संजीव खुदशाह ....यांचा लेख

 मराठी अनुवाद 

2) मतदार 12 सप्टेंबर 2010 बाबाराव वानखडे यांचा लेख.


*✍लेखक याडीकार पंजाब चव्हाण पुसद 📞 मोबाईल नंबर 95 52 30 27 97*📚📚📚📚📚📚📚📚📚


Post a Comment

0 Comments